“निपुण भारत अभियान” अंतर्गत करूया मैत्री गणिताची कार्यपुस्तिका: इयत्ता पहिली ते पाचवी
Maitri Mathematics Workbook: Class I to V under “Nipun Bharat Abhiyan”
National Education Policy 2020 नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यासाठी भारत सरकारने (Nipun Bharat Abhiyan) निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी सुरु केली आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सदर लक्ष्य गाठण्यासाठी इयत्ता व अध्ययन निष्पत्तीनिहाय बेंचमार्क निर्धारित करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात (Nipun Bharat Abhiyan) निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
(Nipun Bharat Abhiyan) निपुण भारत अभियानाच्या लक्ष्यपूर्तीसाठी विद्यार्थ्यांच्या संपादणूकीच्या सध्य:स्थितीची वेळोवेळी पडताळणी होणे आवश्यक आहे, या करिता राज्यस्तरावरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत – अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येत आहे.